राजू शेट्टी पुन्हा हातकणंगले मतदार संघातून लढवणार लोकसभा निवडणूक ; कोल्हापूरात जाहीर केला निर्णय

कोल्हापूर, २२ मार्च २०२३  : आगामी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले सह पाच लोकसभा मतदारसंघातील निवडणुका लढवणार आहे, अशी घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. इतकेच नव्हे, तर मागील निवडणूकीत ज्या हातकणंगले मतदार संघात पराभव झाला, त्याच मतदार संघातून पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचेही शेट्टी यांनी जाहीर केले.

आंबा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रशिक्षण मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकिसाठी लवकरच उमेदवारांची यादी ही जाहीर करणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.

शेतकरी प्रश्नांना घेऊन राजकरणार करणारा पक्ष अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ओळख आहे. खासदार शेट्टी हे देखील सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत असतात. शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवत, त्यांनी हातकणंगले मतदार संघातून मागील लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्याठिकाणी त्यांचा पराभव झाला होता. यंदा शेट्टी हे पुन्हा एकदा त्याच मतदार संघातून निवडणूक लढणार असून, त्यासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप