राज्यात दलितांवर बहिष्काराच्या घटना, चंद्रकांत पाटील म्हणाले, “या प्रत्येक घटनेचा…”

पुणे, ३१ आॅगस्ट २०२२: धुळ्यात बैलपोळ्याला मिरवणूक काढली म्हणून दलित कुटुंबाला मारहाण करत बहिष्काराची घटना घडली. यानंतर राज्यात इतर ठिकाणीही अशाच काही घटना घडताना दिसत आहेत. यावर राज्य सरकार काय पावलं उचलणार, दोषींवर काय कारवाई करणार असा प्रश्न पत्रकारांनी भाजपा नेते व मंत्री चंद्रकांत पाटलांना विचारला. यावर चंद्रकांत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट करत काय घडलंय हे पाहून कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं. ते बुधवारी (३१ ऑगस्ट) पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी या घटनांची माहिती घेईन. या प्रत्येक घटनेचा सह्रदयतेने, संवेदनशीलतेने दखल घेण्याचा प्रयत्न शासन करत आहे.”

“आम्ही गावोगावच्या अशा घटनांवर लक्ष ठेऊन आहोत. त्या घटनांमध्ये काय घडलंय हे पाहून कारवाई केली जाईल,” असं आश्वासनही चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिलं.