“माझ्या लढाईसाठी मला नवीन साथीदार द्या” – आदित्य ठाकरे यांनी केले आवाहन

पुणे, ता. २३/०२/२०२३: “जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण केले जातील, अफवा पसरविल्या जातील, गद्दारांच्या अशा प्रयत्नांना तुम्ही बळी पडणार का ?” असा सवाल करीत “माझ्या लढाईला तुम्ही मला एक नवीन साथीदार द्या. आपल्याला जिंकायचे आहे, महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे,” असे आवाहन शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केले.

कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी ठाकरे यांच्या रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर नाना पेठेतील साखळीपीर तालीम रॅलीचा समारोप झाला. यावेळी झालेल्या सभेत ठाकरे यांनी आवाहन केले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिन अहिर, सुनील केदार, शिवसेनचे शहराध्यक्ष संजय मोरे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, कॉंग्रसचे गटनेते अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील शिंदे, फडणवीस सरकार यांच्यावर ठाकरी भाषेत टिका करताच सभेला जमलेल्या गर्दीतुन “50 खोके एकदम ओके’ अशी जोरदार घोषणाबाजी झाली. “दम असेल तर, महापालिका निवडणुका लावून दाखवा’ असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल, तेव्हा हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारचं, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

“स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके’ अशी मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या सरकाऱ्यांवर टिका करीत ठाकरे म्हणाले, “”महाराष्ट्रात अतिशय घाणेरडे राजकारण सुरु आहे. शिवसेनेचे नाव, चिन्ह चोरले. तुमचे नाव 40 चोरांच्याच यादीत असेल. याच 40 लोकांनी शिवसेनेशी गद्दारी केली, म्हणून त्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी हि निवडणुक जगावेळी आहे. केवळ विदर्भ, मराठवाडा, मुंबईच नव्हे, तर संपुर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.”

गृहीत धरणाऱ्यांना गाडून टाका – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. “”शिवसेनेचे नाव, चिन्ह चोरले. पक्षामध्ये फुट पाडली. लोकमान्य टिळकांच्या कुटुंबीयांवर अन्याय केला, आजारी गिरीश बापट यांना प्रचारात उतरविले. एवढेच नव्हे, तर आमच्या ऍड.सचिन भोसलेंवर हल्ला केला. राजकारणातील अशा पाशवी वृत्तीला खाली उतरवा. गृहीत धरुन राजकारण करणार असतील, तर त्यांचे राजकारण गाडून टाका. मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्‍यता आहे, देशाला हुकूमशाहीतुन वाचविण्यासाठी चिंचवडला नाना काटे यांना, कसब्यात रविंद्र धंगेकर यांना विजयी करा” असे आवाहनही त्यांनी केले.
माझे रक्त पुण्याचेच, बाळासाहेब ठाकरेंचा जन्म पुण्यातला, पुणेकरांकडून मी प्रेरणा घेऊन जातोय. हरण्याच्या भितीपोटी मुंबई, पुणे महापालिका निवडणुक लावण्याची हिम्मत नाही। रिव्हर डेव्हलपमेंटमुळे 5 वर्षात पुराचा धोका, सालीम अली पक्षी अभयारण्य “डंपिंग ग्राऊंड’ केले. शिवसैनिकच नव्हे, सर्वसामान्य नागरीकांच्या मागे ईडी, सीबीआय लावून सत्याची बाजु मांडणाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा
ही संविधानाच्या, लोकशाहीसाठी लढाई आहे, असेही ठाकरे
महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प म्हणाले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप