फडणवीसांच्या राजीनाम्याचा प्रश्‍नच येत नाही – चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका

मुंबई, २ सप्टेंबर २०२३: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना लोखोंच्या गर्दीने मोर्चे निघाले, एकदाही हिंसाचार झाला नाही. कायदेशीर अडचणी दूर करत फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले होते. ते कायम मराठा समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा विषयच येत नाही, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकुळे यांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली.

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली येथं सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. अनेक ठिकाणी निषेध नोंदवल्या जातो. सरकारच्या निषेधात संतप्त मराठा समाजाने अनेक ठिकाणी बसही जाळल्या. दरम्यान, आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानं विरोधी पक्षही सरकारवर टीका करत आहे. गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे.

आज माध्यमांशी बोलतांना बावनुकळे म्हणाले की, मराठी समाजाला आरक्षण आणि सवलती देण्यासाठी मराठी समाजाने २१०४ ते २०१९ याकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना लाखोंच्या संख्येत 60 मूक मोर्चे काढले. एक मराठा, लाख मराठा हे वादळ रस्त्यावर उतरलं होतं. त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं नाही. अत्यंत संयमाने मराठा समाजाने आंदोलन मोर्चे काढल्याने महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या जगाला मराठा समाजाने आदर्श निर्माण करून दिला आहे. त्यावेळी झालेल्या मागणी नंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारने मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले. देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेते आहेत, असं बावनकुळे म्हणाले.

ते म्हणाले, फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं. सुप्रीम कोर्टात देखील आरक्षण टिकलं. मात्र, मध्यंतरीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकार दरम्यान सुप्रीम कोर्टात योग्य बाजू मांडली गेली नसल्यामुळेच मराठा आरक्षण थांबलं असल्याची टीका भाजप बावनकुळे यांनी केली आहे. मराठा समाजाला मीच आरक्षण देतो, असं म्हणणाऱ्या फडणवीसांनी आरक्षण दिलेच नाही, तर उलट लाठीचार्च केला. त्यामुळं फडणवीसांचा राजीनामा मागण्याच्या होत आहे, यावर बोलतांना ते म्हणाले की, मराठा समजाला फडणवीसांनी अनेक सवलती लागू केल्या. मराठा समाजाला ज्या काही आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सवलती मिळाल्या, त्यात फडणवीसांचा मोठा वाटा आहे. सवलती बरोबरच आरक्षणही दिलं. मात्र, दुर्देवानं ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. फडणवीस हे मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असं बावनकुळे म्हणाले.