५० खोकी प्रकरणाचा इडी मार्फत चौकशी कराच – आम आदमी पक्षाची मागणी

पुणे, ३१ ऑक्टोबर २०२२: शिंदे गटातील आमदारांना ५० कोटी रुपये घेतल्याच्या आरोपावरून आमदार रवी राणा व बच्चू कडू यांच्यात वाद पेटला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी शिष्ठाइ केल्यानंतर
राणा यांनी माफी मागितली आहे. पण विषय संपू शकणार नाही याची इडी मार्फत चौकशी करा अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर टीका करताना ५० खोके घेतल्याचा आरोप केला आहे. बच्चू कडूंनी शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला आहे. रवी राणांनी केलेल्या आरोपांवर सुरूवातीला बच्चू कडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यात भूमिका मांडण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, कडू व रवी राणे अशी चर्चा झाल्याचे समजते. हे सर्व सत्ताधारी बाकांवरील आमदार आहेत. दोघांमधील वाद चव्हाट्यावर येण्यास कारण ठरलंय गुवाहाटी आणि खोकेखोके प्रकरण.

खरे तर हा प्रश्न जनतेच्या पैशाचा आणि मतदारांच्या अपेक्षांभंगाचा आहे. हे सर्व फुटीर आमदार कोणत्या आमिषाला बळी पडले आहेत असा जनतेच्या मनात प्रश्न आहे. केला गेलेला आरोप हा तब्बल पन्नास कोटींचा आहे आणि शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांची संख्या पाहता ही रक्कम प्रचंड मोठी होते. हा गंभीर आरोप फक्त च्या दोघांमध्ये मिटवण्याचा नसून याची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. या आरोपाची चौकशी ईडी- सीबीआय मार्फत करायला हवी अशी मागणी आम आदमी पार्टीचे राज्यात अध्यक्ष रंगा राचुरे यांनी केली आहे.