बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहिण विरोधात बॅनर आले कसे? चित्रा वाघ यांची विरोधकांवर टीका

बदलापूर, २१ ऑगस्ट २०२३ ः बदलापूरच्या आदर्श शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडलय. सर्वसामान्यांच्या मनात संतापाची भावना आहे. विविध राजकीय नेते आज बदलापूर शहराला भेट देत आहेत. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ आज बदलापूरला आल्या होत्या. त्यावेळी या आंदोलात लाडकी बहिण योजनेच्या विरोधात बॅनर आले कसे असा प्रश्‍न करत विरोधकांवर हलल्ला चढवला वाघ म्हणाल्या, झालेली गोष्ट अतिशय वाईट, मनाला वेदना देणारी आहे. ज्या वेळी मुलीच्या आईला ही घटना समजली, ती पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये आली. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर सर्वात पहिली प्रोसेस म्हणजे मेडीकल. त्यामुळे मेडीकलला तीन चार तास गेले. ही पॉक्सोची केस आहे. चार-साडेचार वर्षाच्या मुलीला ज्यांना आपल्या शरीराची ओळख नाही. त्यांना बोलत करणं हे पोलिसांच स्कील असतं. मुलींच वय लक्षात घेता, पोलिसांना त्यांना बोलत करण्यासाठी वेळ लागला. एफआयआर दाखल झाल्यानंतर दोन तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या असंही चित्रा वाघ म्हणाल्या. सरकार म्हणून एसआयटीची स्थापना केली गेली. उज्वल निकम यांच्यासारखे वकील या केसला देण्यात आले. सरकार म्हणून अशा गोष्टी टाळण्यासाठी जी जी पावलं उचलण आवश्यक आहे, ते ते सर्व सरकारने केलं असा दावाही त्यांनी यावेळी केला.

बदलापूरमध्ये काल जनतेचा उद्रेक बघितला. स्थानिक आमदार किसन कथोरे सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या प्रक्रियेत होते. गिरीश महाजन तिथे आलेले. केसरकर आले. बरेच लोक मुंबईहून आंदोलन करण्यासाठी आले. ज्या पद्धतीने याला वेगळं स्वरुप दिलं गेलं त्याच दु:ख आहे. आंदोलनकर्त्यांच्या हातात लाडकी बहिण योजना रद्द करा, असे बॅनर होते. सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजे त्या सर्व केल्या. मग लाडकी बहिण योजना नको हे बॅनर का लागले? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळी १० वाजेपर्यंत आंदोलन झाले, त्यामध्ये सगळे बदलापूरकर होते. पण १० नंतर कोण लोक आले? कुठून आले? बदलापूरला इतकी वर्ष पाहतोय, झालेल्या गोष्टीच समर्थन नाही, ती अमानवीय, विकृत कृती आहे. पण ज्या पद्धतीने याला वेगळ स्वरुप देण्यात आलं, या आंदोलनात लाडकी बहीण योजनेचे बॅनर कसे आले? असा प्रश्न विचारत या घटनेच दु:ख आहे असं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या आहेत.