लक्ष्मण हाके मुख्यमंत्र्यांचे ऐकणार का ?

जालना, २१ जून २०२४ ः गेल्या नऊ दिवसांपासून अमरण उपोषणासाठी बसलेलेल्या लक्ष्मण हाके यांची भेट घेऊन अखेर सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरू हाके यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. त्यामुळे आता हाके मुख्यमंत्र्यांचं ऐकतात की उपोषणावर कायम राहणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिष्टमंडळ आणि उपोषणकर्ते यांच्यात चर्चेला सुरुवात झाल्यावर शिष्टमंडळाकडून उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना कागदपत्र देण्यात आले.

हाके यांच्या काय मागण्या आहेत त्यासाठी आज सायंकाळी सरकारची बैठक होणार आहे. त्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी आपलं शिष्टमंडळ पाठवावं असं आवाहन फडणवसी यांनी हाके यांना केल आहे. तसंच, आम्ही कोणत्याही घटकावर अन्यान न होऊ देता निर्णय घेणार आहोत अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. ते सरकारचे शिष्टमंडळ म्हणून हाके यांना भेटण्यासाठी आले होते.

ओबीसी बचाव संदर्भाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांचं बोलण आश्वासक वाटलं का? या प्रश्नावर आम्हाला लेखी पत्र मिळाल्यानंतरच आम्ही विश्वासू ठेऊ असंही हाके यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, शिंष्टमंडळामध्ये मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद डळकर, प्रकाश शेंडगे आणि महादेव जानकर यांचा समावेश असावा असं हाके म्हणाले आहेत.

आंदोलनाचे केंद्रस्थान जालना जिल्हा
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यामागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आतंरवाली सराटी येथून आंदोलनाला सुरुवात केली. गेल्या १० महिन्यापासून त्यांचा संघर्ष सुरु आहे. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांचे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको असे म्हणत जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीमध्ये बेमुदत उपोषण सुरू आहे. वडीगोद्री हे अंतरवाली सराटीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील आंरतवाली सराटी आणि वडीगोद्री ही दोन गावे महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आली आहेत.