uddhav Thackeray

गद्दारांना ५० खोके आम्हाला पंधराशेच – उद्धव ठाकरे यांची टीका

नागपूर, ३० सप्टेंबर २०२४: गद्दारांना ५० खोके आणि आम्हाला १५०० रुपये असं महिला सांगत आहे. २०१४ मध्ये आम्ही देखील मोदींचं प्रचार केला होता तेव्हा मोदी १५ लाख रुपये देणार होते मात्र आता त्याचे १५०० का झाले? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच आम्ही लोकसभा जिंकली आणि आता विधानसभा देखील जिंकायची आहे, लोकं मेली तरी चालेल पण यांना सत्ता हवी अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.

नागपूर येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शहा मला बोलत होते की मी औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक आहे मात्र मी संस्थापक असेन तर तुम्ही अहमदशाह अब्दाली आहात. हे बंद दारामागचे धंदे सोडा आणि हिम्मत असेल तर शिवरांयांच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा, हिम्मत असेल तर शिवसेना संपवून दाखवा असा आव्हान देखील त्यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिला.

तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी सिनेट निवडणुकीवर देखील भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, त्यांनी सिनेटची निवडणुक दोन वर्ष पुढे ढकलली होती मात्र तरी देखील आम्ही जिंकलो. ईव्हीएम नव्हतं म्हणून या निवडणुकीत अभविपला कमी मतं मिळाली. रविवारी निवडणुक होती कोर्टाने हातोडा मारला आणि बुधवारी आपण जिंकलो असं देखील उध्दव ठाकरे म्हणाले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. शिवरायाचा पुतळा दिमाखदार आहे. त्यासाठी शिल्पकाराला धन्यावाद. मधल्या काळात मालवनमध्ये जे झालं ते लाजीरवानं होतं. त्यांना निवडणूक जिंकायची होती. शिवारायाच्या पुतळ्याच पैसे खाल्ले. समितीचा रिपोर्ट आला आणि दाडी खाजवत मिंदे म्हटले वार्याने पुतळा पडला. वार्याने तुमची दाढी नाही हालत, असा टोलाही उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लावला